मुंबई | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (ST Mahamandal) कर्मचाऱ्यांचा पीएफ वेळेवर न भरल्यामुळे तब्बल 100 कोटी रुपयांचे व्याज बुडाल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे. यासोबतच ग्रॅच्युईटी आणि पीएफच्या एकूण 2,345 कोटी रुपयांचा भरणा न झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
महामंडळाच्या ( ST Mahamandal) या निष्काळजीपणामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. संपानंतर राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात “कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लागणारी संपूर्ण रक्कम राज्य सरकार देईल” असे स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम देण्यात आली नसल्यामुळे पीएफ ट्रस्ट आर्थिक अडचणीत आला आहे.
EPFO (कर्मचारी भविष्य निधी संघटना) ने काही नियम व अटी घालून ट्रस्टला मान्यता दिली होती. मात्र, सध्या त्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे ट्रस्टवर कारवाई होण्याची शक्यता आहे. जर ही कारवाई झाली, तर कर्मचाऱ्यांचे भविष्यातील हक्क आणि रक्कम धोक्यात येऊ शकते, अशी भीती कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे, या प्रकरणावर लवकर निर्णय न झाल्यास महामंडळाला आणि कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“मी गोमूत्र खूप पितो”, नितेश राणेंचं विधान चर्चेत
काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी सगळंच सांगितलं | Sangram Thopte
२६/११ हल्ल्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, भाजप नेत्याचा गंभीर आरोप