15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार; जाणून घ्या कुणी केलाय ‘हा’ दावा

पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar)  नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चाही आहे.मात्र आता या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Social activist Anjali Damania) यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट करून खळबळ उडवून दिली आहे.

अजित पवार यांच्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.