Pakistani citizen | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याची मुदत देण्यात आली होती. सरकारच्या आदेशानंतर अनेक नागरिकांनी भारत सोडला आहे. तथापि, जे नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील भारतात राहिले आहेत, त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यांना अटक, खटला, दंड किंवा तीन वर्षांच्या तुरूंगवासाची सजा होऊ शकते.
भारत सरकारने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ अंतर्गत अशा नागरिकांवर (Pakistani citizen) कारवाई करण्याचे ठरवले आहे. या कायद्यानुसार, व्हिसा मुदतीच्या कालावधीतून अधिक काळ राहणारे किंवा व्हिसाचे नियम पाळणारे पाकिस्तानी नागरिक अटकेत टाकले जातील. यासाठी भारत सरकारने संबंधित नागरिकांना त्यांच्या व्हिसा प्रकारानुसार निश्चित केलेली मुदत दिली होती, जी २७ एप्रिलपासून संपली आहे.
त्यानंतर, भारताने पाकिस्तानी नागरिकांच्या देश सोडण्यासंबंधी अधिक कठोर निर्णय घेतले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानच्या विरोधात भारताची भूमिका आक्रमक बनली आहे. सिंधू जल करार स्थगित करण्यात आला असून, अटारी बॉर्डर क्रॉसिंग देखील बंद करण्यात आली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला