ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरेंची माध्यमांना प्रतिक्रिया, म्हणाले…

आदित्य ठाकरे

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तीन दिवसीय दौऱ्यासाठी आज मुंबईत दाखल झालेल्या आहेत. या दौऱ्याची सध्या बरच चर्चा होताना दिसून येत आहे. या दौऱ्यात त्या अनेक महत्वपूर्ण भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील त्या उद्या भेटणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्या भेटणार होत्या, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नाही. म्हणून आज राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. या अगोदर दोन-तीन वर्षांपूर्वी देखील जेव्हा त्या आल्या होत्या, तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे व मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आता मी संजय राऊत यांच्यासोबत आलेलो आहे. अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममतादीदी यांच्यात एक वेगळे नाते आहे. नेहमीच दोघांमध्ये समन्वय राहिलेला आहे.

Previous Post
राजेश्वरी खरात

‘फँड्री’तली शालू झळकणार बॉलिवूडपटात; राजेश्वरीला मिळाले बॉलिवूडचे तिकीट

Next Post
देवकीबाई बोबडे हत्याकांडाचा अखेर झाला पर्दाफाश; आरोपीला अटक झाल्यावर सर्वांनाच बसला धक्का

देवकीबाई बोबडे हत्याकांडाचा अखेर झाला पर्दाफाश; आरोपीला अटक झाल्यावर सर्वांनाच बसला धक्का

Related Posts
पिफमधील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर

पिफमधील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर

पुणे  : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन (Pune Film Foundation and Government of Maharashtra) यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More
Rohit Pawar | इंजिन स्वाभिमानाचा मार्ग विसरले; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar | इंजिन स्वाभिमानाचा मार्ग विसरले; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar | महाराष्ट्रातील शिवतीर्थ शिवाजी पार्कवर शुक्रवारी (17 मे) NDA मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत…
Read More
Raigad Dam | रायगड धरणावर पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Raigad Dam | रायगड धरणावर पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात सहल केली होती. यावेळी रायगड धरणात (Raigad Dam) बुडून त्यांचा…
Read More