कामगिरी दमदार : मंत्रालयानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांतील वीज खंडित

मुंबई – गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर मंगळवारी मंत्र्यांच्या घरचा वीजपुरवठा तब्बल दीड तास खंडित झाल्याची बातमी समोर आली  आहे. मुंबईतील वीजमागणीचा अतिरिक्त ताण बेस्टच्या विद्युत पुरवठा यंत्रणेवर येत असल्याने वीजपुरवठा खंडित (power outage) होण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि त्याचा फटका मंत्रालयाच्या समोरच्या बंगल्यांना बसला. यावेळी मंत्र्यांच्या घरी वेगवेगळ्या कामासाठी आलेल्या लोकांची गर्दी होती.जवळपास दीड तासाने संपूर्ण परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाला.