मोदींचे कौतुक करणे विद्यार्थ्याला पडले महागात; अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने पीएचडीची पदवी नाकारली ?

मोदींचे कौतुक करणे विद्यार्थ्याला पडले महागात; अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने पीएचडीची पदवी नाकारली ?

नवी दिल्ली- अलीगढ मुस्लिम विद्यापीठ (AMU) पुन्हा एकदा सोशल मीडियावर वादात सापडले आहे. खरं तर, एएमयूच्या एका विद्यार्थ्याने आरोप केला आहे की, मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल त्याला पीएचडीची पदवी नाकारली जात आहे.

देशातील प्रतिष्ठित अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडी केलेले दानिश रहीम म्हणतात की, मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा करणे त्यांना महागात पडले आहे. पीएम मोदींची स्तुती केल्याबद्दल एएमयू प्रशासनाने त्यांना पदवी परत करण्याची नोटीस पाठवली असल्याचा आरोप रहीम यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाची मागणी

पंतप्रधानांच्या तात्काळ हस्तक्षेपाची मागणी करताना, AMU चा विद्यार्थी दानिश रहीम म्हणाले  की ‘AMU ने मला भाषाशास्त्रात मिळालेली पदवी परत करण्यास सांगितले आणि त्याऐवजी जाहिरात आणि विपणन (LAM) मध्ये पदवी घेण्यास सांगितले.

मी मोदींची स्तुती केल्यामुळे माझ्यासोबत हे घडत आहे. विद्यापीठाच्या संस्कृतीच्या विरोधात असलेली अशी कामे करण्यापासून दूर राहण्यास सांगितले होते, असे रहीम यांनी सांगितले. मला माझी पीएचडी पदवी परत एएमयूमध्ये जमा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ही प्रतिष्ठित पदवी मिळवण्यासाठी मी 5 वर्षे मेहनत केली आहे, मी माझी पदवी कशी परत करू शकतो? जर एएमयूने माझी पीएचडी पदवी रद्द केली, तर माझी संपूर्ण पदवी करिअर धोक्यात येईल असे रहीम यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

Previous Post
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडे नवी जबाबदारी, 'या' महत्त्वाच्या खात्यात मोठे पद मिळाले

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडे नवी जबाबदारी, ‘या’ महत्त्वाच्या खात्यात मोठे पद मिळाले

Next Post
मोदी

15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार पैसे जमा करण्याची शक्यता

Related Posts
Ambadas Danve - Cm Eknath Shinde

मुख्यमंत्री दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात, दानवेंची शिंदेंवर टीका

संभाजीनगर – हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री…
Read More
विखे पाटलांची कमाल ; 15 वर्षांचा प्रलंबित प्रश्न महसूलमंत्र्यांनी 5 महिन्यात सोडविला

विखे पाटलांची कमाल ; 15 वर्षांचा प्रलंबित प्रश्न महसूलमंत्र्यांनी 5 महिन्यात सोडविला

मुंबई  : भारतीय लष्कर, नौदल व वायुदल या तीनही भारतीय सैन्य दलाच्या पुणे येथील लोहगावस्थित सिव्हिल डिफेन्स गृहरचना…
Read More
uddhav thackeray

स्वाभिमानी बाण्याने वर्षा बंगला सोडणारे ठाकरे इतिहासात नेहमीच उजवे ठरतील – राष्ट्रवादी 

मुंबई  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ…
Read More