शेतकऱ्यांना झगडवणा-या विमा कंपनीची मस्ती सेना उतरवणार – अंबादास दानवे

तुळजापूर – शेतकऱ्यांना (Farmers) झगडवणा-या विमा कंपनीची (Vima Company) मस्ती सेना उतरवणार असल्याचे स्पष्ट करुन संकटात सापडलेल्या बळीराजाला न्याय दे असे साकडे घातल्याची माहीती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रविवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मिडीयाशी बोलताना सांगितले .

यावेळी मिडीयाशी बोलताना दानवे पुढे म्हणाले कि अतिवृष्टी मुळे शेतकरी संकटात सापडला असुन ओलादुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मी देवीला शेतकऱ्यांना न्याय दे आम्हाला काहीही देवु नको परंतु शेतकऱ्यांचा जीव समाधानी ठेव असे देवीचरणी लीन होवुन साकडे घातले.

दरम्यान, यावेळी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने मंदीराचे जनसंपर्कअधिकारी नागेश शितोळे यांनी देवीची प्रतिमा देवुन सत्कार केला. यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, उपजिल्हाप्रमुख शाम पवार, तुळजापूर शहर कदम, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील, तालुकाप्रमुख सुनील जाधव, संजय भोसले, अर्जुन साळुंखे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसैनिक पदाधिकारी सह उपस्थित होते.