दोन महिने पळाले अखेर ‘ईडी’ने गाठले, अनिल देशमुखांना अटक

anil deshmukh

मुंबई : 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडीने अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची 12 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी कोर्टात 11 वाजता हजर करण्यात येणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात सोमवारी हजर झाले. त्यावेळी त्यांचे वकीलही त्यांच्याबरोबर होते. यावेळी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. या प्रकरणी ईडीने देशमुख यांना आतापर्यंत पाच समन्स बजावले होते.

अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान ते ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर रात्री 12 पर्यंत त्यांची चौकशी झाली. म्हणजेच 13 तास मॅरेथॉन चौकशी झाली. या चौकशीदरम्यान ते ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते. ईडीचे अधिकारी त्यांना विविध विषयांवर बोलतं करण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र देशमुख काहीतरी लपवू पाहत होते. अनेक प्रयत्नांतरही देशमुख उत्तरं द्यायला, माहिती द्यायला टाळाटाळ करत होते. अखेर रात्री 12 वाजता ईडीने देशमुख यांना अटक करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गेल्या काही दिवसांपूर्वी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुखांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0

Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पद भरती

Next Post

परमवीर यांंना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव – आशिष शेलार

Related Posts
College Student

‘या’ आहेत देशातील टॉप 5 युनिव्हर्सिटी,जिथे तुम्ही प्रवेश घेतल्यास ज्ञानासोबतच नोकरीच्या चांगल्या संधीही मिळतील

बारावीनंतर विद्यार्थी अभ्यासक्रम आणि विद्यापीठ निवडताना अनेकदा गोंधळात पडतात. आपले भविष्य घडवायचे असेल तर कोणत्या विद्यापीठातून कोणता कोर्स…
Read More
Rajesh Pandey | मोदी सरकारच्या शैक्षणिक आणि युवक धोरणामुळे मोदींनाच मतदान होणार

Rajesh Pandey | मोदी सरकारच्या शैक्षणिक आणि युवक धोरणामुळे मोदींनाच मतदान होणार

Rajesh Pandey | एनडीए सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास शिक्षणावर…
Read More
फुलकोबी

रंगीबेरंगी फुलकोबीला वाढली मागणी, दोन महिन्यांत मिळवा दुप्पट नफा

शेतीत नवनवीन तंत्रे येऊ लागली आहेत. फायदेशीर पिकांच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. या भागात, भारत-इस्त्रायलच्या सहकार्याने स्थापन करण्यात…
Read More