वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन,रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी 

नवी दिल्ली:  वेस्ट इंडिज (West Indies cricket team)दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनला (Shikhar Dhawan)टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)उपकर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये होणार्‍या टी-20 (T-20)आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे, जिथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

बीसीसीआयने (BCCI)बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, फक्त एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे, तर T20 -20 मालिकेची घोषणा नंतर केली जाईल.  पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कारण टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा – 
पहिली एकदिवसीय – 22 जुलै संध्याकाळी 7 वाजता
दुसरी वनडे – 24 जुलै संध्याकाळी 7 वाजता
तिसरी एकदिवसीय – 27 जुलै संध्याकाळी 7 वाजतापहिला T20 – 29 जुलै
दुसरा T20 – 1 ऑगस्ट
तिसरा T20 – 2 ऑगस्ट
चौथा T20 – 6 ऑगस्ट
पाचवा T20 – 7 ऑगस्ट