संयुक्त खतातून पिकांना योग्य मात्रेत खत द्यावे

लातूर :- जिल्ह्यात खरिप हंगामातील पिकाची काढणी पूर्ण झालेली असून, रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू, करडई, भुईमूग पिके आहेत.रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्हयात उपलब्ध् आहेत. परंतू बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डिएपी खताच्या वापराकडे दिसून येतो.

त्यामुळे बाजारात डीएपी खताची मागणी वाढली आहे. उपलब्ध् संयुक्त खतामधून सुध्दा पिकांच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खतांचा आग्रह न धरता संयुक्त खतांतून पिकांना योग्य मात्रेत खत द्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केली आहे.

बाजारात 10:26:26, 15:15:15, 12:32:16 आणि 20:20:0:13 ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध् आहेत. तसेच सिंगल सुपर फास्फेट, म्युरेट आफ पोटॅश, 24:24:00 ही खते देखील उपलब्ध् आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करताना वरील संयुक्त खते द्यावीत, असेही आवाहन कृषि विभागाने केले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत’

Next Post

आर्यन खान आणि त्याच्या कुटुंबाच्या त्रासाची भरपाई कोण देणार – निर्माते संजय गुप्ता

Related Posts
amol mitkari

कितीही खालची पातळी गाठा योग्य वेळी व्याजासकट उत्तर मिळेल; मिटकरींचा भाजपला इशारा

मुंबई –  नागपुरातील वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे.…
Read More
Shri Praveenrishiji | गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते - उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी

Shri Praveenrishiji | गुरू शिष्यांशी नाते जोडतो, तेव्हा वेगळी निर्मिती होते – उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषीजी

Shri Praveenrishiji | संस्कार ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गुरू ज्यावेळी शिष्यांशी नाते जोडतो त्यावेळी वेगळी निर्मिती होत…
Read More
gajendra singh shekhawat

जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे प्रतिपादन

मुंबई – जल संवर्धनासारख्या विषयांवर देशाची ही पिढी गांभीर्याने विचार करेल त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. त्यामुळे पाणी…
Read More