उद्धवजी… तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही  मग राज्य कोण चालवतंय ?

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, गुवाहाटीत शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जायस्वाल यांनी देखील मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना जायस्वाल यांनी म्हटलं की, तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही आणि मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही. मग राज्य कोण चालवतंय ? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

आज आशिष जायस्वाल यांच्या विरोधात रामटेकला निषेध सभा घेण्यात येणार आहे. माजी खासदार प्रकाश जाधव हे करणार ह्या निषेध रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यावर जायस्वाल म्हणाले की, मी तुमच्या पक्षात आहे का की तुम्ही माझा निषेध कराल? मी अपक्ष आहे, मला संविधानाने अधिकार दिला आहे की मी कुठेही जाऊ शकतो. मी 2019 ला बंडखोर होतो, आज नाही. तेव्हा निषेध सभा घ्यायच्या होत्या, तेव्हा घेतल्या का? तेव्हा तर तुम्ही भाजप-शिवसेनेसाठी घेतल्या. आज काय निषेध करता, असं त्यांनी म्हटलं आहे.