‘वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले? 10% हिशोब की बीएमसीचा रेट? सब गोलमाल है!’ 

Mumbai –  राज्यात सध्या वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याने आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. वेदांता गुजरातला जाण्यासाठी कोण जबाबदार? यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर शरसंधान करत असताना आता भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना (Ashish Shelar on Shiv sena) आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला  आहे.

वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते? 10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे! असं शेलार यांनी म्हटले आहे.

‘गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती, तसंच अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती! इतका भ्रष्टाचार बोकाळला होता’, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा दाखलाही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिलाय.