अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर फक्त स्वतःची घरे भरली, पक्ष संकटात असताना मात्र भाजपात गेले

अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर फक्त स्वतःची घरे भरली, पक्ष संकटात असताना मात्र भाजपात गेले

Ashok Chavan | नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे, या हुकूमशाहीला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण ( Ashok Chavan) भाजपात गेले. भाजपात जाताच देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला १५० कोटी रुपये दिले. आता अशोक चव्हाण यांचा सातबारा खोडायची वेळ आली आहे, असे नाना पटोले म्हणाले.

नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली.

या सभेत बोलताना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ६७ हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहे पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसुल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील

भाजपा युती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारातही वाढ | Sharad Pawar

राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे : Avinash Dharmadhikari

Previous Post
मविआचे सरकार येताच मराठवाड्यातील गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, पाणंद रस्तेही मजबूत करू | Nana Patole

मविआचे सरकार येताच मराठवाड्यातील गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू, पाणंद रस्तेही मजबूत करू | Nana Patole

Next Post
सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्यानेच शरद पवारांबद्दल खालच्या पातळीवरची टीका | Naseem Khan

सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्यानेच शरद पवारांबद्दल खालच्या पातळीवरची टीका | Naseem Khan

Related Posts
उद्धव ठाकरे - बाळासाहेब थोरात

सन २०२१-२२ यावर्षी सतरा हजार कोटींचा महसूल जमा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती

मुंबई – राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department)  सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रूपयांचा महसूल…
Read More
eknath shinde

एकनाथ शिंदेंच्या मास्टर स्ट्रोकमुळे सत्तेसोबत पक्षही ठाकरेंच्या हातून जाणार?  

  मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ…
Read More
तिने काय-काय लफडी केली हे...; संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका 

तिने काय-काय लफडी केली हे…; संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका 

 मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. मात्र आता शिंदे…
Read More