स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल

Mumbai : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला.

बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू असा इशारा देखील ठाकरेंनी दिला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान, आता शिंदे गटाकडून आता यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.