अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमे दरम्यान संघर्ष; दोन जणांचा मृत्यू

darang

दारंग – अतिक्रमण हटवण्याच्या मोहीमे दरम्यान आसामच्या दारंग जिल्ह्यात काल संघर्ष होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. धोलपुर गावात ही घटना घडली.

राज्य सरकारनं या प्रकरणी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमण काढण्याचं काम सुरु असताना निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला केल्यानं पोलिसांनी कारवाई केली. यावेळी झालेल्या संघर्षात दोन जणांचा मृत्यू झाला.

जखमी झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, कायदा हातात घेण्यासाठी जनतेला चिथावणी देऊ नये, असं आवाहन सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं विरोधी पक्षांना केलं आहे.

Previous Post
vivek Choudhary

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी नवे वायुदल प्रमुख

Next Post
deshmukh - danave

‘वंदे भारत’ रेल्वेला सोलापुरात थांबा द्यावा, सुभाष देशमुख यांची रेल्वेमंत्री दानवेंकडे मागणी

Related Posts

अभिनेत्री मुक्ता बर्वे ने केले ‘बाईचे माणूसपण हिरावून घेणाऱ्या व्यवस्थेवर’ भाष्य

पुणे – मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्ता बर्वे ने ‘आईचं बाईपण व बाईचं माणूसपण’ या विषयीची सोशल मीडिया वर…
Read More
पाणी टंचाई उपाययोजना, सात कलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा- Shivendrasinghraje Bhosale

पाणी टंचाई उपाययोजना, सात कलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करा- Shivendrasinghraje Bhosale

Shivendrasinghraje Bhosale| जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी केल्या जाणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे. ज्या वाड्या, वस्ती आणि गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होईल,…
Read More
modi - putin

मोदीजी आता तुम्हीच तुमच्या मित्राला समजावा, युक्रेनची मोदींना गळ !

नवी दिल्ली : युक्रेन प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पूर्व…
Read More