वांद्रातून जिंकण्याची औकात नाही, जम्मुमध्ये कुठे उजेड पाडताय? अतुल भातखळकर यांचा ठाकरे गटाला सवाल

Mumbai – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray group MP Sanjay Raut) हे जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. आज पहाटेच संजय राऊत राहूल गांधींसह यात्रेत सहभागी झाले. यात्रेत सहभागी होताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊतांची गळाभेट घेत त्यांचे यात्रेत स्वागत केले. भाजपला डिवचण्यासाठीच ठाकरे गट भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची जोरदार चर्चा आहे.

याचवेळी शिवसेना जम्मू विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे असल्याची घोषणाही राऊत यांनी केली. आता याच मुद्द्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांना आणि ठाकरे गटाला टोमणा मारला आहे. अहो आधी कलानगरच्या अंगणात तरी दिवे लावा, वांद्रातून जिंकण्याची औकात नाही, जम्मुमध्ये कुठे उजेड पाडताय? असा खोचक सवाल भातखळकर यांनी केला आहे.