भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे गटावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून प्रचार केल्याबद्दल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांच्या आवाजात आपले विचार मांडण्याचा पोरकटपणा फक्त उद्धव ठाकरे गटच करू शकतो.ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांचा विरोध करणाऱ्यांशी युती करणाऱ्यांनी त्यांच्या आवाजाचा गैरवापर करू नये. बाळासाहेब असते, तर अशा द्रोह्यांच्या बुडावर लाथच मारली असती.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे ?
धिक्कार…! आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो.
मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले,ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली,वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले…वक्फच्या विरोधात मतदान केले,राममंदिराला सातत्याने विरोध करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसले,370 रद्द करणार्याला विरोध करणार्यांना पाठिंबा दिला,वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली,डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले,मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती….ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडविलात. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजपात बदलाचे वारे; पुणे शहराध्यक्षपदावरही फेरबदलाची शक्यता
MPSC विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करा;रुपाली पाटील ठोंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी