थकवा, ताणतणाव घालवणं असो किंवा सौंदर्य टिकवणं… गरम पाण्याचे आहेत तब्बल एवढे फायदे 

भावना संचेती –  पाणी पिणे शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपण भरपुर पाणी प्यायला हवे. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अधिक फायदे आहेत. अनेक अभ्यास देखील हेच दाखवतात की गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसेच गॅस, अपचन  आणि पोटाचे विकार या सारखे दूर होतात. तर मग आजच्या लेखात आपण पाहू या गरम पाणी पिण्याचे फायदे.

1) पचन व्यवस्था ठेवते व्यवस्थित – सामान्यता अनेक लोकांना पचनाचा खूप त्रास होतो. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे अनेकजण आवडते पदार्थ देखील खाणे  टाळतात. अनेकांना तर पचनाचा इतका त्रास होतो की काहीही खाल्ले तरी ते लगेच बाहेर टाकले जाते. अन्नाचे जर योग्य पचन झाले नाही तर आपल्या आरोग्यावर त्याचा फार वाईट परिणाम होतो. कारण अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते. जर अन्नाचे पचन झाले नाही तर दिवसेंदिवस आपले आरोग्य खराब होत जाते. जर तुम्ही रोज एक गरम ग्लास पाणी पिले तर तुमची पचन व्यवस्था उत्तम राहते. म्हणजेच काय तर तुमची Digestive System उत्तम राहते. आपण जे काही अन्न खातो त्यांचे चांगले पचन होते.

2 ) बदलणाऱ्या हवामानापासून सुरक्षितता – अनेक लोकांना हवामानात थोडासा जरी बदल झाला तरी त्यांचा खूप त्रास होतो. सर्दी , खोकला ,ताप,डोके दुखी असे अनेक त्रास होतात. शिंका येणे असे अनेक त्रास होतात. यासर्वांसाठी एकच उपाय म्हणजे गरम पाणी पिणे. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी आणि एक लिंबू पिळून प्यायला तर त्यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.यामुळे हवामानात कितीही बदल झाला तरी जर तुमची प्रतिकार शक्ति उत्तम असेल तर नक्कीच तुम्ही कोणत्याही हंगामी आजारास बळी पडणार नाहीत. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी एक ग्लास गरम पाणी पिणे कधीही फायदेशीर ठरते.

3 )लठ्ठपणा कमी करते  आज -काल सर्वाधिक आरोग्याची समस्या जर कोणती असेल तर ती लठ्ठपणा. सतत बैठे काम करत राहणे. पावाचे पदार्थ जसे की जंक फूड खाणे , झोपेच्या अनियमित वेळा व्यसने यामुळे लठ्ठपणा (obesity)वाढत जातो. अनेकजण प्रयत्न देखील करतात की वजन कमी व्हावे पण वजन कमी करणे ही फार किचकट प्रक्रिया आहे. यासाठी सातत्य फार गरजेचे आहे.यासाठी अनेकजण अनेक औषधे देखील घेतात ज्यामुळे वजन कमी होऊ शकेल. जर तुम्ही नियमित गरमपाणी प्याले तर तुमच्या शरीरातील फॅट (Body Fats) वितळण्यास सुरुवात होते. त्यासाठी रोज किमान रोज एक ग्लास गरम प्यावे. दोन दिवस गरम प्यायले आणि लगेच वजन कमी झाले असे होतं नाही.यासाठी सातत्य फार गरजेचे आहे.

4) त्वचेवरील चमक वाढवा – फक्त महिलाचं नव्हे तर पुरुषांना देखील त्यांच्या त्वचेची समस्या असते. प्रत्येक व्यक्ती हा स्वताच्या त्वचेची खूप काळजी घेत असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्या त्वचेला चांगली चमक असावी. पण अनेकदा त्वचेच्या काळजीपोटी बाजारातील अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरले जातात. त्यामुळे चेहऱ्यांवरील चमक कमी होते. जर तुम्ही रोज एक ग्लास गरम पाणी प्यायले तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर चमक पुन्हा येईल. गरम पाण्यामुळे शरीरातील सर्व टाकवू पदार्थ बाहेर टाकले जातात. जर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाणी आणि संध्याकाळी झोपताना एक ग्लास गरम पाणी प्यायला तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल.

5 ) तनाव दूर करण्यासाठी उपयुक्त – तनाव (Stress) ही आजच्या युगातील सर्वात मोठी समस्या आहे. आज प्रत्येक व्यक्तीला तनाव हा आहेच. जेव्हा एखादा व्यक्ती तणावात असेल तर त्याचे मानसिक संतुलन ढासळते. आरोग्याच्या देखील अनेक समस्या निर्माण होतात. शाळेत जाणारा विद्यार्थी असो किंवा नोकरी करणारे महिला असो पुरुष सर्वाना तनाव असतोच. तनावासाठी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्या बरोबरच आपण घरगुती उपाय देखील आपण करू शकतो. योगासने किंवा प्राणायम जर आपण केले त्या बरोबरच दररोज एक ग्लास गरम पाणी देखील आपण प्यायला  हवे, यामुळे शरीरातील toxic elements शरीराबाहेर टाकले जातात. Nervous System ला अधिक सक्षम बनविण्यासाठी गरम पाणी (Warm Water)अतिशय उपयुक्त ठरते.

6 ) सर्दी पडसे करते दूर – सर्दी कधीही कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकते. जेव्हा – जेव्हा तुम्हाला सर्दी होते ,तेव्हा तुम्ही कोमट पाणी प्यावे. अनेकदा आपण फ्रीजमधील थंड पाणी पितो , आपल्या शरीराला हा बदल लवकर मान्य होत नाही. त्यामुळे सर्दी आणि पडसे होते. त्यामुळे जेव्हा हवामानात बदल होतो ,तेव्हा सर्दी होते तेव्हा आपण कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरास आराम मिळतो. आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवे की आपण नेहमीचं खूप जास्त थंड पाणी पिणे टाळावे. फ्रीजमधील थंड पाणी पिणे तर आपण आवर्जून टाळायला हवे.

7 ) भूक वाढविण्यासाठी उपयुक्त – लठ्ठपणा ज्या प्रमाणे एक समस्या आहे. अगदी त्या प्रमाणे कमी वजन ही देखील एक समस्या आहे. अनेकांना जेवायला बसल्यानंतर अजिबात जेवण जात नाही. जेवण नीट न गेल्यामुळे वजन देखील वाढतं नाही. जर तुम्हाला जेवण नाही गेले तर तुम्हाला त्यातील पोषकतत्वे काहीच मिळत नाहीत. त्यामुळे प्रतिकार शक्ती  कमी होते. अनेकजण वजन वाढविण्यासाठी अनेक औषधे , गोळ्या घेतात पण त्यामुळे वजन वाढते पण इतर आजार देखील वाढतात.जर तुम्ही रोज एक ग्लास गरम पाणी , काळी मिरी , मीठ आणि लिंबाचा रस जर एकत्र करून प्यायले तर तुम्हाला नक्की भूक लागेल. भूक वाढविण्यासाठी गरम पाणी अतिशय उपयुक्त आहे. गरम पाणी  प्यायल्यामुळे शरीराचे कार्य जलद होते,आणि भूक लागते.

8 ) कंटाळा दुर करण्यासाठी – अनेकदा आपल्याला खूप काम करायचे असते. आपण जेव्हा झोपेतून जागे होतो तसे आपण ठरवितो की आज मी हे सर्व काम करणार आहे. मला हे करायचे आहे , ते करायचे आहे. पण आपण किती जरी ठरविले तर आपली सर्व कामे होत नाहीत कारण आपणाला काही वेळ काम केले तरी थकवा जाणवतो. आणि थकवा जाणवला की आपल्या कामाचा वेग अतिशय कमी होतो. त्यामुळे थकवा आणि आळस दूर करण्यासाठी किमान एक ग्लास गरम पाणी आपण प्यायला हवे. ज्यामुळे आपल्याला संपूर्ण दिवस ताजे -तवाने वाटते. कितीही काम केले तरी थकवा येत नाही.

9 ) चेहऱ्यांवरील मुरमे कमी होतात – आजकाल मुलीचं नाहीतर मुलांना देखील चेहऱ्यावर मुरमे येण्याची समस्या असते. जर तुम्ही रोज एक ग्लास गरम पाणी प्यायलात तर नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरील मुरमे कमी होतील. कारण गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील सर्व अपायकारक गोष्टी शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. आपला चेहरा नितळ आणि साफ होतो. चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.

10 ) मासिक पाळीतील पोट दुखी कमी होते – अनेक मुली आणि महिला यांना मासिक पाळीच्या काळात पोटदुखी ही समस्या जाणवते. अशा वेळेस त्या काळात जर एक ग्लास कोमट पाणी पिले तर नक्कीच आराम मिळतो.