Arvind Kejriwal | “भाजपने देवेंद्र फडणवीस यांना संपवले आता पुढचा नंबर..”, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

Arvind Kejriwal | "भाजपने देवेंद्र फडणवीस यांना संपवले आता पुढचा नंबर..", अरविंद केजरीवाल यांचा आरोप

Arvind Kejriwal | पंतप्रधान देशाला हुकूमशाही कडे घेऊन जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले ते हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत आहेत, असा घणाघात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला. बीकेसी मैदानावरील महापरीवर्तन सभेत ते बोलत होते.

दिल्लीत आम आदमी पक्षाचा नरेंद्र मोदी सामना करु शकत नाहीत, हरवू शकत नाही म्हणून खोटी तक्रार करुन जेलमध्ये टाकले. गरीब मुलांना चांगले शिक्षण व आरोग्याची सुविधा उपलब्ध केली हेच मोदींना नको आहे त्यासाठीच मला अटक करण्यात आली. २ तारखेला पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे पण इंडिया आघाडीचे सरकार आले तर मात्र जेलमध्ये जावे लागणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सर्व विरोधकांना एक तर जेलमध्ये टाकले किंवा त्यांना संपवले. नरेंद्र मोदी भारतातील विरोधकांना जेलमध्ये टाकत आहेत. बांग्लादेशातही तेच चालले आहे. पाकिस्तानतही तेच चालले आहे, मोदी सुद्धा भारताला पाकिस्तान, बांग्लादेश बनवू पहात आहेत. मोदी सरकार पुन्हा आले तर ठाकरे, शरद पवार प्रियंका गांधी सर्व विरोधी नेत्यांना जेलमध्ये टाकले जाईल, अशी भिती केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी एका गूप्त मोहिमेवर काम करत आहेत, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. “एक देश, एक नेता”, ही मोहीम त्यांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी देवेंद्र फडणवीस, शिवराज सिंह चौहान अशा मोठ्या प्रादेशिक नेत्यांचे राजकीय नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकसभा निवडणूक संपन्न होताच आता पुढचा नंबर योगी आदित्यनाथ यांचा आहे. विरोधकांना संपवितानाच मोदी यांनी स्वपक्षातील मोठ्या नेत्यांनाही संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, AICC चे सचिव आशिष दुआ, बी. एम. संदीप, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, शिवसेना खासदार संजय राऊत, तुषार गांधी आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Hardik Pandya | तेलही गेलं अन् तूपही गेलं.. बीसीसीआयचा हार्दिक पांड्याला दणका

Hardik Pandya | तेलही गेलं अन् तूपही गेलं.. बीसीसीआयचा हार्दिक पांड्याला दणका

Next Post
Health News | तुम्ही महिनाभर डाळी खाणे बंद केले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा सर्वकाही

Health News | तुम्ही महिनाभर डाळी खाणे बंद केले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा सर्वकाही

Related Posts
'त्या' पत्राचं काय करायचं ते मी करीन, भूमिका पाहीन; नवाब मलिकांचा विषय निघताच अजितदादांची चिडचिड!

‘त्या’ पत्राचं काय करायचं ते मी करीन, भूमिका पाहीन; नवाब मलिकांचा विषय निघताच अजितदादांची चिडचिड!

Ajit Pawar Role About Nawab Malik: महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले…
Read More
श्वास तपासण्याच्या बहाण्याने स्तनाला आणि पोटाला स्पर्श केला, महिला कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण यांच्यावर आरोप

श्वास तपासण्याच्या बहाण्याने स्तनाला आणि पोटाला स्पर्श केला, महिला कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण यांच्यावर आरोप

नवी दिल्ली- रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh)…
Read More
"चारशे लोक एका टॉयलेटमध्ये, जगणं कठीण झालं होतं.." अभिनेता एजाज खानने सांगितला तुरुंगातील अनुभव

“चारशे लोक एका टॉयलेटमध्ये, जगणं कठीण झालं होतं..” अभिनेता एजाज खानने सांगितला तुरुंगातील अनुभव

Azaz Khan Jail Experience: बॉलीवूड अभिनेता एजाज खानला (Azaz Khan) 2021 मध्ये एनसीबीने मुंबई विमानतळावर ड्रग्ज प्रकरणात ताब्यात…
Read More