या राज्य सरकारने फक्त शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली, हर्षवर्धन पाटील यांचा घणाघात

harshvardhan patil

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

या तोकड्या मदतीवरून आता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलच फैलावर घेतलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सरकारच्या वतीने जाहीर केलेल्या पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली. ही मदत तुटपुंजी असल्याची टीका करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असं ते म्हणाले. राज्य सरकारने जिरायती भागासाठी 10 हजार प्रति हेक्‍टर व बागायती भागासाठी 15 हजार रुपये प्रतिहेक्‍टर रुपये मदत जाहीर केली आहे.

मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर असून काही शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खरवडून गेल्या आहेत. त्यात पुढील दोन वर्षे कोणतेही पीक घेता येणार नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची टीका पाटील यांनी केली. यावेळी राज्य सरकारने या मदतीवर पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=-oKz-KhwmvA&t=4s

Previous Post
sunil kedar

देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार – सुनिल केदार

Next Post
sunil kedar

बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा – सुनिल केदार

Related Posts
आशिष शेलार - आदित्य ठाकरे

वरळीत पोटनिवडणूक करा मग कळेल मशाल आहे की चिलीम – आशिष शेलार

मुंबई – अंधेरी पूर्वच्या (Andheri East Bypoll) निकालानंतर मशाल भडकली असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.…
Read More
जगासमोर संघर्षाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या लाखो मराठा बंधू - भगिनींचे अभिनंदन  - महाजन 

जगासमोर संघर्षाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित करणाऱ्या लाखो मराठा बंधू – भगिनींचे अभिनंदन  – महाजन 

 Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची…
Read More
election

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा…
Read More