‘बच्चूभाऊ जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ४० हजार करा, नाहीतर हा घ्या राजीनामा’

bacchu kadu - sadabhau khot

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप (ST Workers Strike) मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास 90 हजारपैकी 73 हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी (ST Strike) कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानातील आंदोलनातुम भाजपनेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली असली तरी भाजपचा एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठींबा आहे. अशात आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढायला महाविकास आघाडी सरकारमधीलच एक मंत्री समोर आला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार अत्यंत कमी असल्याचे कबुल करत वेळ येईल तेव्हा त्यांच्यासाठी आंदोलन करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. मंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार पगार मिळतो. पण जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त 12 हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले आहे.

यावर आता भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांना टोला लगावला आहे. ‘४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर बच्चु कडू साहेबांना काय चुक काय बरोबर ते कळले.. मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना.. एक तर माझ्या ड्रायव्हरचा पगार १२००० करा नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांचा ४०.००० करा, नाहीतर हा घ्या राजीनामा..!!’ असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM&t=1s

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात ‘या’ योजनेचा झाला तब्बल 57 हजार 80 रुग्णांना झाला लाभ

Next Post

नेपाळ, नेदरलँड्स सरकारनं अफ्रिका खंडातून येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी

Related Posts
आता क्रिकेट दौऱ्यात क्रिकेटपटूंसोबत राहू शकणार नाहीत कुटुंबीय, बीसीसीआयने का घेतला हा निर्णय?

आता क्रिकेट दौऱ्यात क्रिकेटपटूंसोबत राहू शकणार नाहीत कुटुंबीय, बीसीसीआयने का घेतला हा निर्णय?

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना मोठा धक्का देण्याची तयारी बीसीसीआयने ( BCCI) केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी काही नियम…
Read More
संभाजीराजे

‘इतरही अनेक गडांवर झालेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे जलद कार्यवाही करत सरकारने काढून टाकावीत’

कोल्हापूर – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीच्या भोवतीचं बांधकाम हा अनेक वर्षांपासून वादाचा विषय बनला होता. याच अनधिकृत…
Read More

‘राजकारणी मुर्दाडपणे वागले तर जनता हिंसक होणारच’, वागळेंनी केले शाईफेकीचे समर्थन 

पुणे –  भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य…
Read More