पुणे |भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी ( Madhav Bhandari) यांनी २६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात आयोजित एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी म्हटले की, एवढा मोठा हल्ला स्थानिक प्रशासनातील प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीशिवाय शक्यच नव्हता.
‘दाभोलकर हत्या आणि मी’ या विक्रम भावे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी भंडारी म्हणाले की, “मुंबईवर हल्ला होणार असल्याची माहिती आधीच होती, पण तरीही तो टाळण्यात प्रशासन अपयशी ठरले. यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या सत्ताधारी पक्षांचा हात होता, असा माझा ठाम आरोप आहे.”
डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्यांसंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “या हत्या हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी रचलेल्या मोठ्या कटाचा भाग होत्या. न्यायालयात शिक्षा झालेल्या शरद कळसकर व सचिन अंदुरे हे या प्रकरणात खरे गुन्हेगार नसून त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले. त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या विधानांमुळे ( Madhav Bhandari) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी सगळंच सांगितलं | Sangram Thopte
पुणे भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
‘तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हता, मुस्लिमांचे आयुक्त होता…’, भाजप खासदार दुबे माजी सीईसीवर संतापले