भाजपाला प्रसिद्धीसाठी सी ग्रेड फिल्मस्टार्सची गरज पडतेय; राणा दांपत्यावर संजय राऊतांची जोरदार टीका

मुंबई – राज्यात सध्या भोंगे आणि त्याबरोबर हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) जोरात चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ( MNS chief Raj Thackeray ) यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना अमरावतीचे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आज खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी पत्रकार परिषद घेत आपले मुद्दे मांडले. उद्या मातोश्रीवर ( Matoshri ) जाऊन ते  हनुमान चालिसा पठण करणार आहेत असं यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

रवी राणा म्हणाले,  100 धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरणार नाही आहोत, बाळासाहेब ठाकरे हे असते तर त्यांनी आमचे स्वागत केले असते. शिवसेनेला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. हनुमान जंयती दिवशी मुख्यमंत्री यांनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली नाही, त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. आम्हाला नाव स्मरण करण्यासाठी, हनुमान चालीसा पठण करण्यास कोणीही रोकू शकत नाही. असे राणा दाम्पत्यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

दरम्यान, दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. हे फिल्मी लोक आहेत. ही स्टंटबाजी, मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. आणि भाजपाला ( BJP ) आपलं मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज लागत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व काय आहे हे माहिती आहे. या श्रद्धेच्या गोष्टी आहेत,असं संजय राऊत म्हणाले. भाजपाला सध्या मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार, स्टंटबाज यांची गरज लागत असून त्यांचा उपयोग करुन घेत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.