विधान परिषदेच्या निवडणुकीतदगाफटका टाळण्यासाठी भाजपाने नगरसेवकांना गोव्याला पाठवले

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी भाजपाकडून काळजी घेतली जात आहे. भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना पर्यटन वारीवर पाठविले आहे.

नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाला वगळता इतर चार जागी बिनविरोध निवडणूक होणार आहे. भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांना पक्षात घेत काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेसची राजकीय खेळी बघता भारतीय जनता पार्टी सावध झाली आहे. भाजपाने आपल्या काही नगरसेवकांना गोव्याला पर्यटनासाठी पाठविले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीने नगरसेवकांचा घोडेबाजार रोखण्यासाठी रविवारी रात्रीच्या विमानाने जवळपास २६ नगरसेवकांना गोव्याला पाठविले. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांचा घोडेबाजार होऊन मतं फुटू नये, यासाठी भाजपाने पक्षाच्या नगरसेवकांना मतदानापर्यंत बाहेर पाठवले आहे. भाजपाने नगरसेवकांना छोट्या छोट्या समूहात विविध ठिकाणी ठेवण्याचे ठरवले असून, त्याअंतर्गत पहिल्या समूहाला गोव्याला पाठविण्यात आले आहे. उर्वरित नगरसेवक आज -उद्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. पुरुष नगरसेवकांना गोव्यात तर, महिला नगरसेवकांना उत्तर भारतातील पर्यटन स्थळावर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितल्या जात आहे. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांना नागपुरात परत आणल्या जाणार आहे. तो पर्यंत हे नगरसेवक पक्षाच्या खर्चावर पर्यटन वारी करणार आहेत.

निवडणुकीसाठी भाजपाने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने राजकीय खेळी-खेळात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ३४ वर्षे भाजपासोबत राहिलेल्या डॉ. रवींद्र (छोटू) भोयर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली आहे, भोयर स्वतःच नगरसेवक असल्याने भाजपाला नगरसेवक फुटण्याची भीती आहे. भाजपामधील काही नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांच्या संपर्कात असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे काँग्रेस घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या मतांना फटका बसू नये म्हणून,भाजपाने हे सावध पाऊल टाकले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही – वळसे पाटील 

Next Post

2 नंबरी सरकारची 2 वर्ष; चित्रा वाघ यांची ठाकरे सरकारवर काव्यात्मक टीका…

Related Posts
नाना पटोले

नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमय्यांनी आरोप केले होते, त्याचं काय झालं ?

मुंबई –  भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या दररोज आरोप करून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत.…
Read More

५६ वर्षांच्या संसदीय जीवनात निवडून आलेल्या सरकारवर असा निर्लज्ज हल्ला कधीच पाहिला नाही – पवार 

मुंबई  – ‘आप’ चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…
Read More
Delhi Coaching Centre | दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने तिघांचा मृत्यू, राजेंद्रनगरमधील 13 खासगी शिकवणी वर्गांना टाळं ठोकलं

Delhi Coaching Centre | दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरल्याने तिघांचा मृत्यू, राजेंद्रनगरमधील 13 खासगी शिकवणी वर्गांना टाळं ठोकलं

दिल्ली महानगरपालिकेनं जुन्या राजेंद्रनगर भागातल्या 13 खासगी शिकवणी वर्गांना (Delhi Coaching Centre) नियमांचं उल्लंघन केल्यानं टाळं ठोकलं आहे.…
Read More