‘आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौदलाला आज नवीन ध्वज मिळाला या दोन्ही गोष्टी भारतीयांसाठी अभिमानास्पद’

मुंबई :संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि भारतीय नौदलाला आज नवीन ध्वज मिळाला या दोन्ही गोष्टी भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केले.

भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील झाली आहे. आयएनएस विक्रांत संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. या नवीन सूर्योदयाचा आज प्रत्येक भारतीय साक्षीदार झाला आहे. आझादीच्या आंदोलनात क्रांतिकारकांनी एका सशक्त भारताचे स्वप्न पाहिले होते, तेच आज आपण अनुभवत आहोत. आत्मनिर्भर भारत होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून या गोष्टी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिली.