Anurag Kashyap | अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या ( Phule Films) आगामी चित्रपटावर सध्या जोरदार वादंग सुरू आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांती, स्त्री शिक्षण आणि जातिनिर्मूलनाच्या संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या काही दृश्यांवर आणि संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी हे महात्मा फुलेंच्या भूमिकेत तर पत्रलेखा सावित्रीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील ‘महार’, ‘मांग’, ‘पेशवाई’ आणि ‘मनू यांची जातीव्यवस्था’ यांसारख्या जातीवाचक उल्लेखांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत सुधारणा सुचवल्या आहेत. यावरून ब्राह्मण महासंघाचाही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
या वादात आता दिग्दर्शक अनुराग कश्यपही (Anurag Kashyap) उडी घेतली असून, त्याने सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कश्यपने लिहिलं, “माझं पहिलं नाटकच ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंवर आधारित होतं. जर जात नसती, तर त्यांनी लढा दिलाच नसता. आज काही लोकांना या सत्याचा स्वीकार करता येत नाही, त्यांना स्वतःच्या इतिहासाकडे बघायलाच लाज वाटते.”
पुढे तो म्हणतो, “एखादा चित्रपट सेन्सॉर बोर्डात चारच लोक पाहतात, मग हे चित्रपट विविध गट आणि संघटनांपर्यंत पोहोचतात तरी कसे? यंत्रणाच पूर्णपणे भ्रष्ट आहे. हे चित्रपट जनतेपर्यंत पोहोचायच्या आधीच विरोध सुरू होतो.”
कश्यपने चित्रपटांवरील (राजकीय आणि सामाजिक दबावावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “जात, धर्म, वर्णविवेकावर स्पष्टपणे भाष्य करणाऱ्या किती चित्रपटांना अशा पद्धतीने थांबवलं गेलंय हे कुणाला ठाऊक?” असा सवालही उपस्थित केला.
त्याने हेही म्हटलं की, “सत्य स्वीकारायची ताकद नसलेले लोक आरश्यात स्वतःचा चेहरा बघायलाही घाबरतात. त्यांना लाज वाटते, म्हणून ते चित्रपटातील कोणत्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत हेही उघडपणे सांगू शकत नाहीत.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजपात बदलाचे वारे; पुणे शहराध्यक्षपदावरही फेरबदलाची शक्यता
MPSC विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करा;रुपाली पाटील ठोंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी