Asaduddin Owaisi| परभणीत वक्फ कायद्याविरोधात आयोजित संमेलनात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला वाचवण्यासाठी दोन भाऊ एकत्र येऊ शकतात, तर आपल्यालाही एक व्हावं लागेल, असं आवाहन करत त्यांनी मुस्लिम समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले. वक्फ बोर्डावर केलेला हा काळा कायदा मोदी सरकारने मागे घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या भाषणात ओवैसी ( Asaduddin Owaisi) यांनी फक्त नरेंद्र मोदी नव्हे, तर अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांच्यावरही टीकेची झोड उठवली. जर आज आवाज उठवला नाही, तर उद्या नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहून, पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याबाबत राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ओवैसींनीही महाराष्ट्रातील एकतेचा संदर्भ देत मुस्लिम समाजानेही एकत्र यावे, असे भावनिक आवाहन केल्याचे पाहायला मिळाले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला