कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द; जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर यांच्या मतदारांची मतदार यांदी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना मतदारांची प्राथमिक/तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते.

मात्र, बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका क्रमांक 11669/2021 व इतर संलग्न याचिका यात मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद यांनी 18 नोव्हेंबर 2021 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश पारीत केलेला आहे. या आदेशास अनुसरुन मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील 22 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये प्राधिकरणाकडील 6 व 21 ऑक्टोबर 2021 रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. सदर आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप/हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे.

या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘… म्हणून बोंडअळी निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे महत्वाचे आहे’

Next Post
पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले...

पहिली ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले…

Related Posts
महाराष्ट्राचे मैदान भाजपने मारलं पण इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत झालं काय ?

महाराष्ट्राचे मैदान भाजपने मारलं पण इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत झालं काय ?

By-election | देशातल्या विविध 13 राज्यांमधल्या विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीदेखील काल झाली. बिहारमध्ये 4 पैकी 2 जागा भाजपाला,…
Read More
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे पोलीस अधिकारी रणजित कासलेंना अटक

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणारे पोलीस अधिकारी रणजित कासलेंना अटक

Ranjit Kasle arrested | बीड जिल्ह्यातील वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) रणजित कासले याला शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट भागात…
Read More
chitra wagh speaks on mohali bombblast

दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही हे मोदी सरकारचे सुस्पष्ट धोरण आहे – चित्रा वाघ

मुंबई – मोहालीतील(Mohali) पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीवर रॉकेट हल्ल्याची (Rocket attacks on police intelligence office building) माहिती…
Read More