जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल | Harshvardhan Sapkal

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल | Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal  | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal ) यांचा नेतृत्वाखाली आज परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणितीताई शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष व यात्रेचे समन्वयक मोहन जोशी, आ. अमित झनक, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, शहराध्यक्ष नदीम इमानदार, बुलढाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त, रामचंद्र दळवी जितेंद्र देहाडे, सचिव विश्वजीत हाप्पे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव विश्वजीत हाप्पे, धनराज राठोड, मुजाहिद खान, जफर खान, अभय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व परभणीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

Previous Post
भाजपा व रा. स्व. संघाचे जाती धर्माच्या नावावर विष पसरवून समाजात दुही माजवण्याचे काम | Ramesh Chennithala

भाजपा व रा. स्व. संघाचे जाती धर्माच्या नावावर विष पसरवून समाजात दुही माजवण्याचे काम | Ramesh Chennithala

Next Post
अमृता फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुणे सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

अमृता फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट; पुणे सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Related Posts
Jasprit Bumrah

जगात भारी : जसप्रीत बुमराह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत जगातील नंबर वन गोलंदाज बनला

नवी दिल्ली– आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ODI क्रिकेटमधील गोलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या अपडेटमध्ये भारताचा वेगवान…
Read More

पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे होणार बालदिन साजरा

पुणे : पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे 14 नोव्हेंबर रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस हा…
Read More
Ajit Pawar

पहिली ते आठवीपर्यंत शाळेबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय !

पुणे : पुण्यातील कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या आता कमी होत आहे. त्यासोबतच लसीकरण सुद्धा वेगाने होत आहे. त्यामुळे…
Read More