छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना राज्यपालांचे कार्यक्रम उधळणार

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतीच पत्राद्वारे भूमिका जाहीर केली. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर कार्यवाही झाली नसल्याने संभाजीराजेंनी पुन्हा सरकारचे कोशारींच्या वक्तव्याला समर्थन आहे का हा प्रश्न उपस्थीत केल्यानंतर स्वराज्य संघटना मैदानात उतरली आहे.

‘कोश्यारी हटवा, दिल्लीला परत पाठवा’ म्हणत राज्यभरातील पदाधिकारी कोशारी यांच्या विरोधात निदर्शने करुन निवेदने देण्यात येतील तसेच राज्यपालांचे राज्यभरातील कार्यक्रम स्वराज्य संघटना उधळून लावेल असा इशारा स्वराज्याचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी दिला आहे.