सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- दिलीप वळसे-पाटील

पुणे :- सहकारी चळवळीमुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासोबत परिसराचा विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नवीन जागेच्या स्थलांतरीत वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा सहकारी सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंकित जाधव आदी उपस्थित होते.

वळसे-पाटील म्हणाले, शासनातर्फे ग्रामीण भागाच्या विकासासाठी पाणी, स्वस्त दरात वीज, पक्के रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. तसेच साखर कारखाने, विविध सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, दूध उत्पादक संघ यांच्यावतीने शेतकऱ्यांना मदत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करुन प्रगती करावी. कळंब परिसराचा विकास करण्यास मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वित्तीय संस्थेत कारभार पारदर्शक असला पाहिजे, कर्ज वाटप करतांना कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, असेही वळसे-पाटील म्हणाले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

भाजपा कार्यकर्त्याच्या कार्यक्रमात चंद्रकांतदादा चिंब भिजले

Next Post

वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी अतुल बहुले यांची निवड

Related Posts
Uddhav Thackeray

कोरोनाची लाट येते मग भगव्याची लाट का नाही येणार, उद्धव ठाकरेंनी फोडली डरकाळी

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी…
Read More
school

पहिल्यांदा शाळेत जाणार्‍या मुलाला पालकांनी काय सूचना द्याव्यात ? मुलाशी पालकांनी कसे वागावे ?

शाळेच्या पहिल्या दिवसासाठी मुलाला तयार करताना, पालकांनी आश्वासन, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन प्रदान करणे महत्त्वाचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांशी…
Read More
वाल्मीक कराड तर दाऊदलाही मागे सोडून गेला, त्याने पोलिसांनाच बिळात घातले; आव्हाडांचा खोचक टोला

वाल्मीक कराड तर दाऊदलाही मागे सोडून गेला, त्याने पोलिसांनाच बिळात घातले; आव्हाडांचा खोचक टोला

Jitendra Awhad | गुंडांना जात नसते, गुंडांना फक्त आपला स्वार्थ दिसत असतो. वाल्मीक कराडने सीआयडीसमोर येण्यापूर्वी एक व्हिडिओ…
Read More