दिलासादायक : देशात महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक

नवी दिल्ली – भारतातील महिलांची संख्या पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा अधिक झाली असून हे प्रमाण १ हजार पुरुषांच्या तुलनेत १०२१ महिला असे झाले असल्याचे राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षण- ५ (एनएफएचएस-५)मध्ये आढळून आले आहे. देशाच्या लोकसंख्याशास्त्रात झालेला बदल यातून प्रतिबिंबित झाला आहे.

‘हे लक्षात घेता, लिंग गुणोत्तर (Sex Ratio) १ हजारांपलीकडे गेल्यामुळे भारत आता विकसित देशांच्या रांगेत आला असल्याचे आपण म्हणू शकतो’ असे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक बाबतीत महिलांचा सहभाग, तसेच लैंगिक भेदभाव आणि विषमता यांच्याशी लढा यांसारख्या महिला सक्षमीकरणाच्या उपाययोजनांना याचे श्रेय असल्याचे ते म्हणाले.

जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर २०१२-१६ सालच्या ९१९ वरून २०१९-२० साली ९२९ पर्यंत वाढले आहे. यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या (पीसी अँड पीएनडीटी अ‍ॅक्ट) अंमलबजावणीसारख्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

२००५-०६ साली झालेल्या एनएफएचएस-३ सर्वेक्षणानुसार, लिंग गुणोत्तर १०००:१००० असे होते आणि २०१५-१६ साली (एनएफएचएस-४) ते ९९१:१००० इतके घसरले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
Shambhuraje Desai

आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार – शंभूराजे देसाई 

Next Post

‘भंगार मलिक दमच्या वार्ता करू नको, जावई दम विकताना पकडला गेला होता’

Related Posts
भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने रविवारी नमो वॉकेथॉनचे आयोजन

भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने रविवारी नमो वॉकेथॉनचे आयोजन

Namo Walkethon:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी नमो वॉकेथॉनचे…
Read More

नवरात्रीच्या उपवासात ‘या’ 5 चुका करू नका, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते, जाणून घ्या कसे?

Navratri Vrat 2024: आज नवरात्रीचा (Navratri 2023) तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या पवित्र प्रसंगी, बहुतेक लोक नऊ दिवस उपवास…
Read More
भाजपाला पराभव दिसू लागल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न – नाना पटोले

भाजपाला पराभव दिसू लागल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न – नाना पटोले

Nana Patole:- भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यातून व केंद्रातूनही सत्तेच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे.…
Read More