पाकिस्तानच्या लष्करात गोंधळ! युद्धाच्या धक्यात राजीनाम्यांची रांग

पाकिस्तानच्या लष्करात गोंधळ! युद्धाच्या धक्यात राजीनाम्यांची रांग

Pakistan Army | काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याने भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाकिस्तानकडूनही सीमारेषेवर सैन्याची हालचाल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युद्धाचे ढग गडद होत असतानाच पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणावर राजीनामे दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानच्या 11व्या कोअरचे प्रमुख (Pakistan Army) ओमर अहमद बोकारी यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना लिहिलेल्या गोपनीय पत्रानुसार, 12 क्वेटा कोअर, फर्स्ट कॉर्प मांगला रिजन आणि नॉर्दन कमांडमधील अनेक अधिकारी व सैनिकांनी राजीनामे सादर केले आहेत. फक्त फर्स्ट कॉर्प मांगला रिजनमध्येच 50 अधिकारी आणि 500 सैनिकांनी लष्कर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वैयक्तिक कारणे, वाढलेला तणाव आणि सरकारकडून मिळणाऱ्या योग्य धोरणाचा अभाव, ही राजीनाम्याची मुख्य कारणे असल्याचे समोर आले आहे. सध्या पाकिस्तानी लष्कराने युद्धाच्या काळात राजीनामा देण्यावर बंदी घातली असून, ही पडझड तात्पुरती थांबवली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी 1948, 1965, 1971 आणि 1999 साली युद्धे झाली असून, प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे आगामी युद्धाची भीती पाकिस्तानमध्ये पसरली आहे. अनेक लष्करी अधिकारी आणि नेते आपल्या कुटुंबांसह पाकिस्तान सोडून पळ काढत आहेत. अलीकडेच लष्करप्रमुख असीम मुनीर आणि नेते बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबीयांनी परदेशात स्थलांतर केल्याची माहितीही समोर आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला

Previous Post
पाकिस्तानी लीग सोडून बॉशचं मुंबई इंडियन्सकडून पदार्पण

पाकिस्तानी लीग सोडून बॉशचं मुंबई इंडियन्सकडून पदार्पण

Next Post
महाराष्ट्रासाठी भाऊ एकत्र येतात, मग आपण का नाही?; ओवैसींची मुस्लिमांना साद

महाराष्ट्रासाठी भाऊ एकत्र येतात, मग आपण का नाही?; ओवैसींची मुस्लिमांना साद

Related Posts
Rajya Sabha Election बिनविरोध होणार! भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

Rajya Sabha Election बिनविरोध होणार! भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) भाजपा ने अशोक चव्हाण (Ashok Chavan), मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि अजीत गोपछडे…
Read More
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

Devendra Fadavis :  कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. यामध्ये राष्ट्रीय व…
Read More
"कृपया तुमचे पैसे वाया घालवू नका..", अंकिता वालावलकरने दिला 'पुष्पा 2' न पाहण्याचा सल्ला

“कृपया तुमचे पैसे वाया घालवू नका..”, अंकिता वालावलकरने दिला ‘पुष्पा 2’ न पाहण्याचा सल्ला

Ankita Walawalkar | बहुप्रतिक्षित पुष्पा 2 सिनेमाने 3 दिवसांत जगभरात जवळपास 500 कोटींचा गल्ला जमवला आहे. अजूनही लोक…
Read More