राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

Harshvardhan Sapkal | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला मुठमाती दिली पाहिजे आणि लोकशाही व संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न जे पक्ष करतील त्यांच्यासोबत काँग्रेस असेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sapkal) म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष भाजपा विरोधात लढत आहे, शरद पवार हे इंडिया आघाडीचे एक महत्वाचे नेते आहेत, काही राजकीय घटना घडली तर त्यानंतर भूमिका घेता येईल. राज्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही एकत्र लढलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय हे स्थानिक पातळीवर घेतले जातील असेही सपकाळ म्हणाले.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले असून सर्वांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. काँग्रेस पक्षाने केंद्र सरकार सोबत असल्याचे जाहीर केले आहे. एकदिलाने एकसंध राहून दहशतवादाचा मुकाबला करून दहशतवाद समुळ संपवला पाहिजे. आपण २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेस दुभंगलेला समाज पाहिला तसे यावेळी दिसत नाही हे विशेष महत्वाचे आहे. पाकिस्तानवरील हल्ल्याकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. काही जण दावे करून हवा देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची गरज नाही, चुकीच्या घटना टाळाव्यात असे आवाहनही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!

‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा

दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

Previous Post
मागणी असलेल्या गावांना तात्काळ पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या - Chhagan Bhujbal

मागणी असलेल्या गावांना तात्काळ पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या – Chhagan Bhujbal

Next Post
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाच्या पोस्टरवरून वाद; दिग्दर्शकाची माफी | Operation Sindoor

‘ऑपरेशन सिंदूर’ सिनेमाच्या पोस्टरवरून वाद; दिग्दर्शकाची माफी | Operation Sindoor

Related Posts
अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार- केसरकर

अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार- केसरकर

पुणे : अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार असल्याचे प्रतिपादन…
Read More
राज्य सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलींच्या पुणे जिल्हा संघाला विजेतेपद

राज्य सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलींच्या पुणे जिल्हा संघाला विजेतेपद

पुणे : औरंगाबाद (संभाजीनगर) येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलींच्या गटातून पुणे जिल्हा संघाने…
Read More
Sandhya Sawwalakhe | महिलांवर अत्याचार करणाऱ्या व त्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाने नारीशक्तीवर बोलावे हेच आश्चर्यकारक

Sandhya Sawwalakhe | महिलांवर अत्याचार करणाऱ्या व त्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाने नारीशक्तीवर बोलावे हेच आश्चर्यकारक

Sandhya Sawwalakhe | भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची…
Read More