‘बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचे भाषण अतिशय बोगस होतं’

मुंबई – मुंबईत काल पार पडलेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात (dasara melav) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhad thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर राज्यातील भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसाद लाड (prasad lad) यांनी उद्धव ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शब्दात सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे यांचे भाषण अतिशय बोगस होतं. या भाषणातून विचाराचे सोनं तर सोडा पण काय भंगार मिळाला हा प्रश्न पडतोय. भंगार लोकांसोबत राहून हे असं झालं. फडणवीस कायदा पाळत नाहीत का? कायद्याची भाषा उद्धव ठाकरे करत आहेत परंतु मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक कोणी केली होती. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांच्या विरोधात कोणी षडयंत्र रचलं होतं?

उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत आहेत, परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे किती हाल केले हे नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी सांगितले आहे. युतीमध्ये निवडणूक लढवून महाविकास आघाडी (MVA) सोबत गेला तेव्हाच भाजपच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला.

अमित शहा (Amit Shah) यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी इतिहास पहावा, 70 वर्षात जे झालं नाही ते अमित शहा यांनी करून दाखवलं. 370 कलम हटवलेला आहे पाक व्याप्त कश्मीर देखील ते घेतील. तुम्ही बारा वाजता झोपेतून उठतात, तुम्हाला ते कधी घेतले हे कळणारही नाही.