आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकहितासाठी एका वर्षासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकहितासाठी एका वर्षासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

Chandrakant Patil | शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील EWS प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र सादर केले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवे ळची विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कचरा काढून टाकला पाहिजे, सैफवर खरंच चाकूने वार झाले की अभिनय करत होता – Nitesh Rane

श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करण्याऐवजी बाळासाहेबांना भारतरत्न द्या – Sanjay Raut

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार; 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार

Previous Post
अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभातील किन्नर आखाड्यात झाली सहभागी

अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभातील किन्नर आखाड्यात झाली सहभागी

Next Post
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा

Related Posts
Amravati Assembly | विजयात निर्णायक भूमिका असलेल्या मुस्लिमांना काँग्रेसने अमरावतीची उमेदवारी द्यावी; भाजपाचे आव्हान

Amravati Assembly | विजयात निर्णायक भूमिका असलेल्या मुस्लिमांना काँग्रेसने अमरावतीची उमेदवारी द्यावी; भाजपाचे आव्हान

Amravati Assembly | भारतीय जनता पार्टी एकाही मुस्लिमाला उमेदवारी देत नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात…
Read More
Vijay Wadettiwar | मुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन कार्पेट, मुंबईकरांसाठी जिकडे तिकडे चिखल! वडेट्टीवार यांचा निशाणा

Vijay Wadettiwar | मुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन कार्पेट, मुंबईकरांसाठी जिकडे तिकडे चिखल! वडेट्टीवार यांचा निशाणा

Vijay Wadettiwar | मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रीपासून मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.…
Read More

रॉयल एनफिल्डने लॉन्च केली नवी बाईक, गेमचेंजर ठरणार RE Super Meteor 650

नवी दिल्ली- भारतीय मोटरसायकल निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने मोठा धमाका केला आहे. Meteor 350 नंतर आता कंपनीने त्याचे…
Read More