आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकहितासाठी एका वर्षासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकहितासाठी एका वर्षासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय

Chandrakant Patil | शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या जवळपास १ हजार ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात आलेल्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) संवर्गातून प्रवेशित झालेल्या १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील EWS प्रमाणपत्राऐवजी केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र सादर केले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन, केवळ या शैक्षणिक वर्षाकरिता एकवे ळची विशेष बाब विद्यार्थ्यांनी सादर केलेले केंद्र सरकारच्या नमुन्यातील EWS प्रमाणपत्र या प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिले आहेत असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कचरा काढून टाकला पाहिजे, सैफवर खरंच चाकूने वार झाले की अभिनय करत होता – Nitesh Rane

श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करण्याऐवजी बाळासाहेबांना भारतरत्न द्या – Sanjay Raut

दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार; 15.95 लाख रोजगारनिर्मिती होणार

Previous Post
अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभातील किन्नर आखाड्यात झाली सहभागी

अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, महाकुंभातील किन्नर आखाड्यात झाली सहभागी

Next Post
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा

Related Posts
नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे पुढे बसण्याची संधी मिळाली नाहीतर, पुढे येण्याची संधी मिळाली नसती - जयंत पाटील

नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे पुढे बसण्याची संधी मिळाली नाहीतर, पुढे येण्याची संधी मिळाली नसती – जयंत पाटील

Jayant Patil- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी येथे ज्योत…
Read More
T20 World Cup 2024 | उपांत्य फेरीसाठी पंचांची घोषणा, टीम इंडियाची 'पनौती' दूर

T20 World Cup 2024 | उपांत्य फेरीसाठी पंचांची घोषणा, टीम इंडियाची ‘पनौती’ दूर

टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत.…
Read More

हे माहितीय का? जगातील एक असा देश जिथे नाही एकही नदी, पाण्याची गरज भागवण्यासाठी…

पाण्याशिवाय (Water) पृथ्वीवरील जीवनाची (Life On Earth) कल्पनाच करता येत नाही. पाण्याशिवाय आपल्या संपूर्ण दिनचर्येतही फरक पडतो. भारतातील…
Read More