Delhi Government | भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या रजा पुढील आदेशापर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या दृष्टीने घेण्यात आला असून, सर्व विभागांनी संपूर्ण सज्जता ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, भारतीय सैन्याने गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानातील १६ शहरांवर जोरदार प्रतिहल्ले करत मोठा धक्का दिला आहे. इस्लामाबाद, लाहोर, पेशावर यांसारख्या प्रमुख शहरांवर हवाई आणि ड्रोन हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे पाकिस्तानात मोठा गोंधळ उडाला असून, अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट करावा लागला आहे.
राष्ट्रीय राजधानीतही सुरक्षाव्यवस्था कडकदिल्ली पोलिसांना ( Delhi Government) आणि आपत्कालीन सेवा विभागांना उच्च सतर्कतेवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन, विमानतळ, मेट्रो स्टेशन आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेचा कडा वाढवण्यात आला आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली! भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 50 ड्रोन्स पाडले
ज्याने पाकिस्तानला सळो की पळो केलं ते एस-400 सिस्टीम नक्की आहे तरी काय?
धरणही उद्ध्वस्त! सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताची पाकिस्तानला दुसरी जोरदार चपराक