दिल्लीतील (Delhi News) जुन्या राजेंद्र नगर येथील राव कोचिंग सेंटरमध्ये पाणी साचल्याने दोन विद्यार्थिनींसह तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोचिंग सेंटरच्या तळघरात सुरू असलेल्या लायब्ररीत पावसाचे पाणी तुंबल्याने आयएएसची तयारी करणाऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या आधी अनेक अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली.
तळघरात प्रवेश करण्यासाठी काचेच्या दरवाजाला बायोमेट्रिक प्रणाली असल्याने विद्यार्थ्यांना अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. सायंकाळी सातच्या सुमारास कोचिंग सेंटरच्या बाहेरील रस्त्यावर काही मोठ्या वाहनांनी यू-टर्न घेतल्याने तळघराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरील काचेचा दरवाजा पाण्याच्या दाबाने तुटल्याचे सांगण्यात येत आहे. पाणी लगेच तळघरात वाहू लागले.
तळघर काही सेकंदात पाण्याने भरले
पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की काही मिनिटांतच तळघरात बरेच पाणी साचले. अचानक तळघरातून विद्यार्थी बाहेर येऊ लागले. त्याचवेळी शॉर्ट सर्किटमुळे वीजही गेली. या अपघातात दोन विद्यार्थिनी आणि एक मुलगा आतमध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नेमके कारण शोधले जात आहे
तळघरात पाणी शिरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली
मध्य दिल्लीचे पोलीस (Delhi News) उपायुक्त एम. हर्ष वर्धन म्हणाले – तिन्ही पीडित युनियन लोकसेवा आयोगाचे (UPSC) उमेदवार होते, जे राऊ आयएएस कोचिंग संस्थेत शिकत होते. उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर (यूपी) येथील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या सोनी आणि केरळमधील एर्नाकुलम येथील निविन डॅल्विन अशी तीन बळींची नावे आहेत. आरएमएल रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Sharad Pawar : आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका, शरद पवारांची स्पष्टोक्ती
Piyush Goyal : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी, पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
Prakash Ambedkar : राजकीय चेहरा दाखवू तरच आपण आरक्षण टिकवू; ॲड. प्रकाश आंबेडकर