‘देशातील लोकशाही संपलेली आहे, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक’

'देशातील लोकशाही संपलेली आहे, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक'

Shivsena :  शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे टर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राज्यातल्या सत्ता संघर्षाशी संबंधित याचिका सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची शिवसेनेच्या उद्वव ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळली. काल कामकाज सुरू होताच न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. त्यामुळे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार असून येत्या मंगळवारी, 21 फेब्रुवारीपासून या प्रकरणाची नियमित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

दरम्यान, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून न्यायालयानं गुणवत्तेवर निर्णय घ्यावा.आमचं सरकार बहुमताचं आणि कायद्याने स्थापन झालेलं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देशातील लोकशाही संपलेली आहे; हा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे असं ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Previous Post
कैलाश पर्वत

बर्फ वितळल्यावर कैलाश पर्वतावर ऐकू येतो मृदंगाचा नाद! जाणून घ्या भगवान शिवच्या भूमीविषयी रंजक गोष्टी

Next Post
हिंदुत्व आणि विकासाठी मनसे भाजप सोबत; रवींद्र चव्हाण यांनी घेतली पुण्यातील मनसे नेत्यांची भेट

हिंदुत्व आणि विकासाठी मनसे भाजप सोबत; रवींद्र चव्हाण यांनी घेतली पुण्यातील मनसे नेत्यांची भेट

Related Posts

अक्षर पटेलने थाटामाटात उरकलं लग्न, जाणून घ्या नेमकी कोण आहे त्याची पत्नी मेहा पटेल?

काही दिवसांपूर्वीच यष्टीरक्षक केएल राहुल याने अभिनेत्री अथिया शेट्टी (KL Rahul Athiya Shetty Wedding) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.…
Read More
Rohit Sharma | रोहितच्या मनाचा मोठेपणा, प्रशिक्षकांना जास्त बोनस रक्कम मिळावी म्हणून स्वत:चा बोनस देण्यासही झाला तयार!

Rohit Sharma | रोहितच्या मनाचा मोठेपणा, प्रशिक्षकांना जास्त बोनस रक्कम मिळावी म्हणून स्वत:चा बोनस देण्यासही झाला तयार!

Rohit Sharma | 2024 च्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची…
Read More

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश…
Read More