Department of Meteorology | राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठे नुकसान

Department of Meteorology | राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचं मोठे नुकसान

Department of Meteorology | राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं तसंच १९ जिल्हयातील उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्हयात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आंबा, नारळ, फणस, काजू, केळी, द्राक्षे, पपई, लिंबू आदीसह भाजीपाला कांदा, मका, मिरची, तीळ तसंच भात, गहू, रब्बी ज्वारीच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.

नैऋत्य मौसमी पाऊस यंदा ३१ मे च्या सुमारास केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या वर्षी आठ जून रोजी मान्सून केरळमध्ये आणि ११ जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. हवामान विभागाच्या (Department of Meteorology) अंदाजानुसार, यंदा २८ मे ते ४ जून दरम्यान हा पाऊस दाखल होईल. दक्षिण अंदमानमध्ये येत्या रविवारपर्यंत मान्सून येण्याची शक्यता हवामान खात्यानं यापूर्वीच वर्तवली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Arvind Kejriwal | केजारीवालांच्या स्वीय सहाय्यकाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार

Arvind Kejriwal | केजारीवालांच्या स्वीय सहाय्यकाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढणार

Next Post
IPL 2024 | सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमध्ये एन्ट्री, चौथ्या स्थानासाठी चेन्नई-बेंगळुरूमध्ये चुरशीची लढत

IPL 2024 | सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमध्ये एन्ट्री, चौथ्या स्थानासाठी चेन्नई-बेंगळुरूमध्ये चुरशीची लढत

Related Posts
कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड...

कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड…

Ajit Pawar’s letter – रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे…
Read More
मनसेने काढली खड्डेमय महामार्गाची अंत्ययात्रा

मनसेने काढली खड्डेमय महामार्गाची अंत्ययात्रा

पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खड्डे, खचलेला रस्ता, अर्धवट कामाच्या निषेधार्थ पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा…
Read More
MP Supriya Sule

तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचं कारण काय? सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल

मुंबई – सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे…
Read More