‘बंद सरकारचा ढोंगीपणा उघड बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदत जाहीर करा’

devendra fadnvis -

मुंबई : महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हे पूर्णत: ढोंगी सरकार आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. राज्यात 2000 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना ना कर्जमाफीचा लाभ, ना कोणती मदत. अशात त्यांना मदत देणे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे.

निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी बाध्य केले जात आहे. संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे. मावळमध्ये निष्पाप शेतकर्‍यांवर गोळीबार होतो, राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना लाठ्या-काठ्यांनी तुडविले जाते, तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

या सरकारने सार्‍या योजना बंद केल्या, अनेक योजनांना स्थगिती दिली. गेले दीड वर्षे बंदच पाळला. पण, आताकुठे थोडे उघडले, तर पुन्हा बंद. हे अख्खं सरकारच ‘बंद सरकार’ आहे. आमचे कार्यकर्ते मुंबईच्या खड्ड्यांविरोधात आंदोलन करतात, तर त्यांचे कपडे फाडून त्यांना मारण्यात आले. आता सरकारपुरस्कृत हिंसा केली जात असताना पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. तमाशा पाहतात. या तोडफोडीची, मालमत्ता नुकसानीची वसुली महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली पाहिजे.

मंत्रिमंडळ बैठकीत बंदचे निर्णय होतात, असे महाराष्ट्रात प्रथमच होते आहे. या सरकारमध्ये थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल आणि यांना खरोखर शेतकर्‍यांप्रति कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांसाठी मदत जाहीर झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=XjmHK3oCVPg&t=2s

 

Previous Post
amruta fadnvis - rupali chaknakar

‘संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’

Next Post
nilam gorhe

महानगरपालिकेत जनतेच्या मनातला भगवा फडकेल – नीलम गोऱ्हे

Related Posts
धक्कादायक! जैन मुनींची निर्घृण हत्या; कूपनलिकेत सापडले मृतदेहाचे तुकडे

धक्कादायक! पैशांसाठी जैन मुनींना संपवलं; कूपनलिकेत सापडले मृतदेहाचे तुकडे

कर्नाटकातील बेळगावी येथील चिक्कोडी तालुक्यात दिगंबर जैन साधू कामकुमार नंदी महाराज यांची हत्या (Jain Monk Murder Case) करण्यात…
Read More
पक्षाची भरभराट व्हावी यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये होम-हवन

पक्षाची भरभराट व्हावी यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवनमध्ये होम-हवन

Pune News : पक्षाची भरभराट व्हावी, पक्षातील गटातटात एकी व्हावी, यासाठी ‘सर्व सिद्धी’ पुजा करून होम-हवन करण्याची घटना…
Read More
आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर... सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे...

आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर… सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे…

नागपूर  – आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा…
Read More