मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला; दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा

मुंबई –  मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबला, असा आरोप अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.

दिपाली यांनी शनिवारी (22 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीका केली.त्या म्हणाल्या, "काही वेळापूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना भेटणं खूप सोपं होतं. मात्र उद्धव ठाकरे अद्यापही नॉटरिचेबल आहेत.

दिपाली या काल संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. दिपाली यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जवळपास अर्धा ते एक तास दिपाली सय्यद आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दिपाली या वर्षा बंगल्याबाहेर दाखल झाल्या आणि त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.