सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आमनेसामने आले आहेत. अंजली दमानिया या सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात बरेचसे पुरावेही शोधून काढले असल्याचे ते सांगतात. आता धनंजय मुंडे यांनी दमानिया यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.
मंगळवारी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे ( Dhananjay Munde) म्हणाले की, अंजली दमानिया यांनी बीड जिल्हा आणि येथील लोकांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी आजवर अनेकांवर आरोप केले. मात्र, त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. अंजली दमानिया यांना राजकारणात पुन्हा यायचे असेल. त्यामुळे स्वत:ची न्यूज व्हॅल्यू वाढवण्यासाठी अंजली दमानिया अशाप्रकारे आरोप करत आहेत का, हे बघितले पाहिजे.
अंजली दमानिया यांचे आरोप धादांत खोटे आहेत. आम्ही शांत बसलो आहोत, असे कोणीही समजू नये. आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकचे काहीच नाही, असा समज कोणीही करुन घेऊ नये, असा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांवर ४८ तासात कारवाई करा- Rupali Chakankar
नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन् माजी सभापतीला निर्दयीपणे संपवलं