Eknath Shinde | लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केली.
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमदेवाराच्या प्रचारासाठी वैजापूरमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये आणि फक्त सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे असा कायदा आहे का ? असा सवाल करत मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केले असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला दिले.
मुख्यमंत्री असताना ते उघड्या डोळ्यांनी शिवसेना संपत असताना पाहत राहिले. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना आणि धनुष्यबाण बांधला होता. तो आम्ही सोडविण्याचे काम केले. शिवसेना वाचविण्याचे काम केले आहे. शिवसैनिकांचे होणारे खच्चीकरण थांबविण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांना गाडण्याची भाषा काही लोक करत आहे. त्यांची कबर खोदण्याची भाषा करतात. त्यांच्यामध्ये ही हिंमत आहे का? असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Murlidhar Mohol : पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही- मुरलीधर मोहोळ
Amol Kolhe | शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार, अमोल कोल्हे यांची घोषणा