‘मंत्र्यांनी वसुली आणि हप्तेबाजी कमी केली तरी सरकारचा महसूल वाढू शकतो’

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत. महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान, याच मुद्यावरून आता भाजप आमदार राम सातपुते यांनी टीका केली आहे ते म्हणाले, सरकारचा महसूल वाढवण्यासाठी किराणा दुकानांमधे दारु विकायची गरज नाही. मंत्र्यांनी वसुली आणि हप्तेबाजी कमी केली तरी सरकारचा महसूल वाढू शकतो. पण दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील ? असा सवाल सातपुते यांनी उपस्थित केला आहे.