कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीतसुद्धा सरकारने जनतेचे हित जपत सर्वांची काळजी घेतली – येवले

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, युवासेना सहसचिव शर्मिला येवले यांनी सरकारच्या कामगिरीबाबत आपलं व्यक्त केले आहे.त्या म्हणाल्या, दोन वर्षात अनेक कठीण काळात सरकारने अनेक संकटांना तोंड दिलं निसर्ग चक्रीवादळ , कोरोना, महापूर नैसर्गिक संकटातून सरकारने राज्याला बाहेर काढत नागरिकांना दिलासा दिला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आपल स्थान तयार केलं आहे . सरकार दुसरं कोणी नसून सरकार तुम्ही आहात, तुमच्या सगळ्यांच आहे, तुमच्यासाठी आहे हे या दोन वर्षात महाविकास आघाडीने दाखवून दिलं.

कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती असेल निसर्गाचा प्रकोप असतील यात सुद्धा सरकारने जनतेचे हित जपत सर्वांची काळजी घेतली आहे. त्यामुळे सरकारची एक वेगळी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात रुजली आहे गावोगावी खेडोपाडी सरकारने केलेल्या कामाबद्दल आपलेपणा जपला आहे. अनेक विकासाची कामे सरकारने हाती घेतलीत कर्जमाफी पासून ते नैसर्गिक संकटात सापडलेल्या कोकणा पर्यंत ही मदत पोहोचली आहे. अवकळी पावसात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत ही पोहचवयला सरकार पुढे आल. राज्यात महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी सर्वतोपरी मदत सरकार करत आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘भंगार मलिक दमच्या वार्ता करू नको, जावई दम विकताना पकडला गेला होता’

Next Post

परमबीर-वाझे भेटीची चौकशी होणार, एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही – वळसे पाटील 

Related Posts
ajit pawar - anna hazare

‘सहकार मंत्र्यांनी एकदा अण्णा हजारेंना भेटून चौकशीचा अहवाल त्यांना द्यावा आणि त्यांचा गैरसमज दूर करावा’

मुंबई : राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून…
Read More
Abdul Sattar

मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार आहे. युतीसाठी हिंदुत्त्ववादी पार्टीसोबत गेलो, तर त्यात काही चूक नाही’

मुंबई – राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं.…
Read More
Thane Shivsena | ठाण्यात उबाठा गटाला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्तिथीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Thane Shivsena | ठाण्यात उबाठा गटाला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्तिथीत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

उबाठा गटाच्या युवा सेनेला (Thane Shivsena) ठाणे शहरात खिंडार पडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्तिथीत…
Read More