कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज | Harshvardhan Sapkal

कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज | Harshvardhan Sapkal

मुंबई | (Harshvardhan Sapkal) कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही शोषणावर आधारीत व्यवस्था संपवण्याची गरज आहे त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीत लढ्या द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आधी उद्योगपती होते आता व्यापारी झाले आहेत आणि ते फक्त नफ्यासाठी काम करत आहेत त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरिब अधिक गरिब होत चालला पण देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही, “श्रीमंतांनी श्रीमंत होणे पाप आहे का?” असे पंतप्रधान म्हणतात ही अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. पंतप्रधानांना गरिबांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. गरिब, कष्टकरी, कामगार यांच्या विरोधातील हे सरकार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले.

मोदी सरकारचे कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे, त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच, अशा शक्तीविरोधात लढायचे आहे. नाही रे वर्गासाठी लढले पाहिजे, कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही, कृती कार्यक्रम घेऊन काम करा, मोठी चळवळ उभी करा आणि एकत्र येऊन लढा द्या, असे काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी’

मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका

Previous Post
भारतीय लष्कराचे शौर्य युवापिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी – Parag Kalkar

भारतीय लष्कराचे शौर्य युवापिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी – Parag Kalkar

Next Post
बुध्दगया मंदिर कायदा बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

बुध्दगया मंदिर कायदा बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

Related Posts
Kirit Somaiya

सोमय्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आता भाजप त्यांचाच पाठींबा घेणार ?

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduhriday Samrat Balasaheb Thakre) यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि…
Read More
Pratap Patil Chikhalikar

नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल; प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

Mumbai – नांदेड महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी सत्ता जाणार हे निश्चित असतानाही १५० कोटींच्या…
Read More
T20 WC 2024 सोबत पाकिस्तान संघ वर्ल्ड कप 2026 मधूनही बाहेर? वाचा सविस्तर

T20 WC 2024 सोबत पाकिस्तान संघ वर्ल्ड कप 2026 मधूनही बाहेर? वाचा सविस्तर

यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 WC 2024) पाकिस्तान क्रिकेट संघासाठी खूपच वाईट ठरला आहे. पाक संघ आता विश्वचषकातून बाहेर…
Read More