१ मे २०२५ पासून तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे आर्थिक ( Financial transactions) बदल लागू होत आहेत. बँक एटीएम व्यवहारांवरील शुल्क वाढले असून, आता प्रत्येक व्यवहारासाठी १९ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, जे आधी १७ रुपये होते. बॅलन्स तपासण्यासाठीही शुल्क ६ रुपयांवरून ७ रुपये करण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांसाठी वेटिंग तिकिट केवळ सामान्य डब्यांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. स्लीपर कोचमध्ये वेटिंग तिकिट घेऊन प्रवास करता येणार नाही. तिकीट बुकिंगचा आगाऊ कालावधी १२० दिवसांवरून कमी करून ६० दिवस करण्यात आला आहे.
बँकिंग क्षेत्रात ‘एक राज्य, एक आरआरबी’ योजना लागू करण्यात ( Financial transactions) आली असून, याअंतर्गत ११ राज्यांतील प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र करण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. यामुळे बँकिंग सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याच्या सुरुवातीला बदल होतो, त्यामुळे उद्यापासून नवी दररचना लागू होण्याची शक्यता आहे, जी घरगुती खर्चावर परिणाम करू शकते.
रेपो दर कपातीनंतर एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदर अनेक बँकांनी कमी केले आहेत. हे नवे दर १ मेपासून लागू होण्याची शक्यता असून, गुंतवणूकदारांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. एकूणच, १ मेपासून होणारे हे आर्थिक बदल नागरिकांच्या रोजच्या व्यवहारांवर लक्षणीय परिणाम करू शकतात. त्यामुळे या सर्व बदलांची पूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
“भारताने खरेदी केली २६ राफेल-मरीन विमाने, फ्रान्सबरोबर ६३,००० कोटींचा करार”
महाराष्ट्रासाठी भाऊ एकत्र येतात, मग आपण का नाही?; ओवैसींची मुस्लिमांना साद
MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा, पेपरमधील चुकांचे गुण विद्यार्थ्यांना द्या