शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्या; Supriya Sule यांची मागणी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून सरसकट कर्जमाफी द्या; Supriya Sule यांची मागणी

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे, असे सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हमीभाव, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले
सुळे म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीदरम्यान कांदा, सोयाबीन, कापूस, आणि दुधाला हमीभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. राज्यातील शेतकरी अडचणीत असून महागाई आणि वित्तीय तूट वाढत असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.

वाघांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून “ऑपरेशन टायगर” राबवण्याचे स्वागत
सुळे यांनी महाराष्ट्रातील वाघांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारच्या “ऑपरेशन टायगर” उपक्रमाचे स्वागत केले, मात्र त्याचवेळी राज्य सरकारने देखील अधिक ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

“लाडकी बहीण” योजनेवर प्रश्नचिन्ह
सुप्रियाताई सुळे यांनी “लाडकी बहीण” योजनेवर टीका करताना विचारले की, बांगलादेशी महिलांचे अर्ज निवडणुकीआधी का समोर आले नाहीत? यावरही त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.शेतकऱ्यांसाठी सरकारने तत्काळ पावले उचलून सातबारा कोरा करण्याच्या दिशेने काम करावे, असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले.

Previous Post
दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा- Sharad Pawar

दावोसमधून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचा सरकारचा दिखावा- Sharad Pawar

Next Post
दु:खद! भारतीय क्रिकेटरच्या कुटुंबातील व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

दु:खद! भारतीय क्रिकेटरच्या कुटुंबातील व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

Related Posts
पुण्यात बंडखोरांनी वाढवली काँग्रेसची डोकेदुखी! जाणून घ्या कोण कोण अपक्ष लढणार

पुण्यात बंडखोरांनी वाढवली काँग्रेसची डोकेदुखी! जाणून घ्या कोण कोण अपक्ष लढणार

Vidhansabha Election | राज्यात 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 4 हजार…
Read More
लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता, तब्बल 46 हजार कोटींची तरतूद! योजना सुरुच राहणार..

लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता, तब्बल 46 हजार कोटींची तरतूद! योजना सुरुच राहणार..

ladki bahin yojana | “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या…
Read More
Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार

नंदुरबार (Rahul Gandhi) – आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत, या देशातील जल, जंगल व जमीनीवर पहिला हक्क…
Read More