म.फुले आणि अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या – रामदास आठवले  

रामदास आठवले

मुंबई  – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सकाळी संसदेत भेट घेतली. यावेळी उभयनेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती करण्यात यावी या रिपाइं च्या प्रस्तावावर ही चर्चा करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्रीशिक्षणा चे उद्गाते प्रणेते महापुरुष आहेत.त्यांनी स्त्रीशिक्षण; दलितांचे शिक्षण, दलित आणि स्त्रियांच्या मानवी हक्क,शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले काम युगप्रवर्तक आहे.भारत राष्ट्र म्हणून महापुरुषांच्या विचारांमुळे माजबुतीने प्रगती करीत आहे. महत्मा फुलेंचे कार्य अजोड आणि सदैव प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांच्या युगप्रवर्तक कार्याचा भारतरत्न ‘किताब देऊन गौरव करण्यात यावा याबाबतचे पत्र आज रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान दिले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर गाजलेले आणि अखिल मानवजातीला प्रेरणादायी साहित्य आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा भारतरत्न या किताबाने गौरव झाला पाहिजे.यामागणीचे पत्र  रामदास आठवले यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांना दिले.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप ने आरपीआय सोबत युती करून काही जागा सोडाव्यात. भाजप आरपीआय युती झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपला आरपीआयमुळे मोठे यश मिळविता येईल अशी भूमिका रामदास आठवले यांनी अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे.

Previous Post
narendra modi

India Q2 GDP Data : सलग दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर वाढला

Next Post
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्यावतीनं आझाद मैदानात महापंचायतीचं आयोजन

शेतकरी आंदोलनात झालेल्या मृत्यूची आकडेवारी नाही, मग नुकसान भरपाई कशी देणार ?

Related Posts

पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या म्होरक्यासह सात जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पिंपरी चिंचवड : पुण्यातील सहकार नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या (Pune Crime News) कोयता गँगच्या (Criminal Gang) मुसक्या आवळल्या…
Read More
Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Jitendra Awad | बीड लोकसभा मतदार संघात बोगस मतदान झाल्याचा खोटा आरोप करतांना दुसऱ्या राज्यातील व्हिडिओ सोशल मिडियावर…
Read More
राहुल गांधींवर कसाबसारखा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा - नितेश राणे

राहुल गांधींवर कसाबसारखा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट पाकिस्तानला पाठवा – नितेश राणे

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं…
Read More